अज्ञात वाहनाच्या धडकेत जख्मी चितळाचे उपचारा दरम्यान मृत्यू

0
302

यश कायरकर.:

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गोविंदपुर बीटा मधून जानारा तळोधी – नेरी रस्त्यावर बुधवार 16 फरवरी ला सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक चितळ जख्मी असलेले आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांनी या मादा चितळ अंदाजे वय 9 ते 10 महिने , जखमी अवस्थेत आनुन तिचा उपचार करून सावरगाव येथील रोपवाटिके मध्ये ठेवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना आज शुक्रवारी 18 फरवरीला सकाळी मेल्याचा निदर्शनास आला. त्यानंतर पंचनामा करून त्याला जाळण्यात आले. यावेळेस गोविंदपुर बीटाचे क्षेत्र सहाय्यक आर. एस. गायकवाड, वनरक्षक पी.एम. श्रीरामे, स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष, यश कायरकर, संस्थेचे सदस्य, महेश बोरकर , भारत भाऊ चूनारकर, रोपवाटिकेतील वनरक्षक डी. डब्ल्यू. येडणे , वनमजूर के बी पाकडे, इत्यादींच्या उपस्थितीत होते. मृत चितळाला रोपवाटिका सावरगाव येथे जाळण्यात आले.
अशा प्रकारे शेकडो वन्यजीव दर वर्षी रस्ता अपघातात मारले जातात. यात नागपुर – मुल – चंद्रपुर हायवे हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, करांडला अभयारण्य, व घोडाझरी अभयारण्य यामधून गेलेला आहे. हायवे असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहने ही भरधाव वेगाने असतात. आणि जंगलातून हा रस्ता गेल्यामुळे व वन्यजीवांचा हा भ्रमण मार्ग असल्याने वन्य प्राणी रस्त्याने ये-जा करीत असतात. नेहमी या तीन पैकी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कधी दुचाकीला तर कधी मोठ्या वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी गंभीर जखमी किंवा अपघातात मरतात. मात्र यात फक्त चितळेच नव्हे तर वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानगवे, लांडगा,कोल्हे, या सारखी मोठी प्राणी तर साप, मुंगूस, कासव, घोरपड, सारखे सरीसृप प्राणी सुद्धा या रस्त्याच्या अपघातात मोठ्या संख्येने मारले जात आहेत. याकडे फक्त वनविभागाने, किंवा वन्यजीव प्रेमी, पर्यावरणवादी संस्था, यांनीच लक्ष देऊन चालणार नाही. तर रस्ते बांधकाम विभागाने सुद्धा या गंभीर बाबीला समजून जंगलातील, जंगलालगत च्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी रस्ते बांधकाम करताना . वन्यप्राण्यांच्या रस्ते अपघातात होणाऱ्या हानीची गांभीर्याने विचार करून. रस्ते बनवताना ज्या ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचे भ्रमंती मार्ग आहेत त्या त्या ठिकाणी रस्त्यावर फक्त ‘गतिरोधक’ बनवून रस्त्याला वरून जाणाऱ्या वाहनांच्या वेग मर्यादा कमी करून हे अपघात टाळता येणार नाही याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. व अश्या वन्यजीवांच्या अपघातस्थळी ‘उड्डाणपुलाची’ निर्मिती किंवा ते शक्य नसल्यास रेल्वे प्रमाणे बोगदे(भुयारी मार्ग) निर्माण करायला हवे.
तसेच वनविभागाच्या तर्फे वाहनांच्या गतीवर नियंत्रण करण्यासाठी फक्त फलक लावुणच जमणार नाही. तर त्यांनीही अशा ठिकाणी अंडर पास असल्यास ती जागा सोडून रस्त्याच्या दोन्ही कडेला रस्त्यावर अचानक वन्यप्राणी येऊन अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही कडेला जंगलालगत जाळी लावून. अंडर पास पर्यंत ची जागा बंद करून त्यातूनच प्राण्यांना ये-जा करता येईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. जेणेकरून रस्त्यावर येऊन वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही. ही बाब समजून घेऊन शासनानेही गंभीरतेने बघून दोन्ही विभागामार्फत नियोजन करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here