त्या वनरक्षका वरील कारवाई ही चुकीची, कारवाई मागे घ्यावी, परिसरातील नागरिकांची पत्रकार परिषदेत मागणी

0
389

तळोधी बा.(यश कायरकर)

तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील वनरक्षक पी.एम.गायकवाड यांच्या आलेवाही बिटाच्या नाक्‍यावर आलेवही येथे 21 ऑक्टोबरला धाड टाकून नाक्याच्या भिंतीलगत व बाजूला सुरक्षा भिंतीला लागून ठेवलेले व नाक्याजवळील मोकळ्या जागेत गोळा करून ठेवलेले सागवानाचे लाकडे 2.220 घनमीटर अंदाजे 1.50 लक्ष रुपयाची किंमत असलेले लाकडे हस्तगत करण्यात आली होती. व पी.एम.गायकवाड वनरक्षक यांच्यावर वन गुन्हा अनुसार कारवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. व गुप्त सूचनेच्या आधारे त्यांच्या परिचित लोकांच्या घरी सुद्धा तपासणी करण्यात आल्या मात्र त्यात कुठलाही वन ऐवज जप्ती अधिकाऱ्याला हस्तगत करता आला नव्हता. ही कारवाई गुप्त सूचनेनुसार अतिरिक्त कार्यभार असलेले वन विभागाचे प्रभारी वन अधिकारी सतीश चोपडे यांनी केली होती.
मात्र सदर घटनेची स्थानिक पत्रकारांना कुठलीही प्रेसनोट देण्यात आली नाही मात्र एका प्रसिद्ध दैनिकाचे पत्रकार यांनी एकशे पन्नास किलोमीटर अंतरावरून त्यांच्या सदर दैनिकात या कारवाही संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी वाचल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी, शेतकरी व स्थानिक पत्रकारांनी वास्तविकता व प्रकाशित झालेली बातमी यात १००% चुकीचे लिहून वनरक्षक गायकवाड यांना त्या वर्तमानपत्राने व त्या पत्रकारांने बदनाम केल्याचे व संबंधित गायकवाड वन रक्षकाने न केलेल्या गुन्ह्यात कुणाच्या तरी राजकीय दबावामुळे जाणुनबुजून गुंतवले जात आहे. असे परिसरातील व गावकरी आणि शेतकरी यांच्या लक्षात आले. व या घटनेविरोधात व केलेले कारवाई बद्दल पुनर्विचार करून वनरक्षक गायकवाड यांना पुन्हा आमच्याच आलेवाही बिटात पूर्ववत नियुक्त करावे. अशी मागणीचे हे निवेदन मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रविण यांच्याकडे 27 आक्टों. ला देण्यात आले मात्र या निवेदना संदर्भात कुठल्याही प्रकारची शहानिशा वरिष्ठ अधिका-याने केली नाही. त्यामुळे आलेवाही बिटातील ५०० लोकांच्या सह्या असलेले निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना सुध्दा उप वनसंरक्षक ब्रम्हपुरी, वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या सोबत चर्चा करून त्यांच्या समक्ष देण्यात आले.
आलेवाही बीटा मध्ये 4-5 वर्षे पुर्वी वनरक्षक पी.एम. गायकवाड हे जेव्हापासून बदलून आले तेव्हापासून त्यांनी आज पर्यंत कोणतेही चोरीचे कार्य या बिटात केलेले नाही. उलट परिसरातील लाकूड चोरी, सागवान चोरी, अतिक्रमण आणि अवैध शिकार यावर त्यांनी आळा घातला होता. त्यांनी काही लोकांचे जंगलातून चोरून नेतांना सागवानाची लाकडे व काही वाहने जप्त करून वनविभागाच्या वनपरिक्षेत्र तळोधी व सावरगाव लकडा डेपोमध्ये जमा केली आहे. व सरळ सरळ काही व्यक्ती वर वन गुन्हा दाखल केला. त्यामुळे गायकवाड या बिटात असेपर्यंत सागवान चोरीचा धंदा चालणार नाही या भीतीपोटीच कोणीतरी चोरट्यांनी त्याच्याविरोधात खोटी माहिती पुरवून कारवाई करायला लावली, व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी पुर्व तपासणी न करता . बिट नाक्यावर आपल्याच बिटातील पडझडीचे लाकडे कुणी चोरांनी चोरुन नेऊ नये म्हणून नाक्याच्या भिंतीलगत व रस्ता लगतच गोळा करून ठेवलेली होती. मात्र चोपडे यांनी पुर्णपणे शाहनीशा न करता . लाकडे चोरीचे आहे म्हणून वनरक्षकांवर लगेच निलंबनाची कारवाई केली.
“नेहमीच आपल्या कार्यात दक्ष व जंगलात पूर्ण वेळ देणारे , मानव-वन्यजीव संघर्ष करिता अत्यंत संवेदनशील असलेल्या १७.५ चौरस किमी. क्षेत्र असलेल्या व सतत वाघ, बिबट्यांच्या हल्ल्यात, ते सुध्दा गावात येऊन वाघ पाळीव प्राणी उचलून नेतो हे सतत आलेवाही बिटातील नित्यक्रम आहे ,व पाळीव प्राणी सप्ताहाला 1-2 याप्रमाणे मारले जात असतानाही सर्व परिसरातील लोकांची, शेतकऱ्यांशी समन्वय साधून, विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना कुठल्याही प्रकारचे त्रास न होउ देणारे, पत्नी ची बाळंतपणाची वेळ असतांनाही बिटातील जिवनापुर गावात महीनाभर रात्रभर शेकोटी पेटवून गस्ती करत आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कुचराई न करता, परिसर शांत ठेवणार्या गायकवाड वनरक्षकानी जंगलातील पडझडीचे लाकडे कुणी चोरांनी चोरुन नेऊ नये म्हणून त्यांच्या नाक्याच्या गोळा करून ठेवलेली होती. ही परिसरात मिळालेली व जप्ती केलेली लाकडे विकण्यासाठी नव्हे तर विभागात जमा करण्याकरताच गोळा केलेली होती. मात्र *सतत चे जंगली डुक्कर,हरीन, रानगवे यांच्या मुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसानीची पंचनामे, गावातील बिबट्या, वाघाचे चे धुमाकूळ त्यामुळे गावात रात्री च्या गस्ती, पाळीव प्राण्यांची वाघ, बिबटे च्या हमल्यात गुरें-ढोरे मेल्यावर पंचनामे, कॅमेरा चेकींग* यात या व्यस्ततेमुळे त्यांनी ती लाकडे डेपोमध्ये जमा केली नसावी. मात्र त्यांच्यावर चोरीचा आरोप लावणे चुकीचे असून योग्य पद्धतीने तपास करून त्यांची पुनरनियुक्ती करावी” असी लोकांनी या पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.यावेळी सरपंच योगिता सुरपाम, ग्रा.पं.सदस्य पंकज कुमार नंदेश्वर, पो.पाटील सचिन राज बनसोड, त.मु.स अध्यक्ष विठ्ठल टेकाम, माजी उपसरपंच हितेश मडावी, सामाजिक कार्य. यदुनाथ लेंझे, देवानंद सुरपाम, ग्रा.पं.सदस्यां भावना जनबंधू, ज्योतिबा जनबंधू, आशिष शेख, पितांबर कुचलवार, आदी गावकरी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी वाघाच्या शिकारी, व वाघाचे नखं व दात अशी अवयवांची तस्करी व विक्री प्रकरणात याच बिटातील लोकांना दबोचन्यात आले. हे तस्करीचे काळे धंदे त्यांना गायकवाड वनरक्षक बिटात असतांना करता आले नाही. व ही तस्करी पूर्ववत सुरू व्हायला हवी आहे म्हणून यांनीच खोटी माहिती पुरवून कारवाई करायला लावली होती, व त्यांचेवर आपल्या कार्यकाळात गायकवाड यांनी लाकडाची तस्करी करतांना मुद्देमालासह ऑटो,व इतर वाहने जप्त करून नावासह गुन्हे नोंद केली आहेत त्यांनीच पी.एम. गायकवाड, या वनरक्षका विरोधात खोटी माहिती पुरवून कारवाई करायला लावली आहे. या कारवाईमुळे आत्ता या बिटात *’चोरांना रान मोकळे झाले’* असे पत्रकार परिषदेत वन्य ऊपज, लाकडे, शिकार करुन तस्करी करनार्यांवर आरोप लावण्यात आले.
वन रक्षक उपस्थित नसतांना व फक्त पत्नी व एक वर्ष वयाचा मुलगा घरात असताना सुध्दा, धाड टाकनार्या अधिकार्याने तळोधी बा.चे कोणतेही वन अधिकारी, किंवा गावातील कोणतेही नागरिक, किंवा कोणतीही महीला अधिकारी सोबत नसताना घरात घुसून तपासणी केली, व वनरक्षकाला आपले स्पष्टीकरण देण्याची मुभा न देता तात्काळ निलंबित केले हि कार्यवाही सुध्दा चुकिची होती. त्यामुळे हि कार्यवाही कोनत्याही नियमानुसार झाली नव्हती, व याबद्दलची चौकशी सुध्दा करण्यात आली पाहिजे. असीही मागणी केली.व या वनरक्षकाविरोधात केलेले कारवाई बद्दल, त्यांनी या बिटात आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन, निलंबनाच्या कारवाईच्या बाबतीत पुनर्विचार करून वनरक्षक गायकवाड यांना पुन्हा आमच्याच आलेवाही बिटात पूर्ववत नियुक्त करावे. असी मागनी पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी रेटुन धरली.

वनरक्षक गायकवाड हे आमचे बिटात आल्या पासून, शिकार, लाकडे तस्करी, अतिक्रमण हे पुर्णपणे बंद केले आणि म्हणूनच त्यांनी खोटी माहिती पुरवून कारवाई करायला लावली आहे. तरी पी.एम.गायकवाड वनरक्षक यांच्याविरोधात केली कार्यवाही मागे घ्यावी, व त्यांना आमच्या आलेवाही बिटातच परत वनरक्षक म्हणून रुजू करावे.
– योगिता देवानंद सुरपाम
सरपंच ग्रामपंचायत आलेवाही.

गुप्त माहितीच्या आधारे घरात फर्निचर बनवीत असल्याची माहिती मिळताच नाक्यावर धाड मारून कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी भिंतीलगत लाकडे मिळाली. त्यावर कोणताही नंबर टाकलेला नव्हता. आता ती समोरील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोडने यांच्याकडे सोपवली आहे.
-सतीश चोपडे
प्रभारी विभागीय वनविभाग अधिकारी दक्षता विभाग चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here